कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या स्वच्छता मोहिमेला सोमवार (दि.२३) पासून सुरुवात होणार आहे. मुंबई येथील संजय मेंटेनन्सचे कर्मचारी कोल्हापुरात आले असून अत्याधुनिक मशिन यंत्रणेद्वारे मंदिराची स्वच्छता करण्यात येणार आहे. यामध्ये मंदिराचा बाह्य आवारापासून शिखरे, गाभारा, गर्भकुटी स्वच्छ करण्यात येणार आहे. पुढील चार दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे. स्वच्छता झाल्यानंतर अंबाबाईच्या नित्यांलकारासह खास नवरात्रकाळातील पूजेसाठी परिधान करण्यात येणाऱ्या सोने व चांदीच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे.